लाडक्या बहिणींना लडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी व मार्च महिन्याचे पैसे दोन्ही एकदाच वितरित करण्यात येत आहे त्या मुळे त्यांना आता तीन हजार रुपये एकत्रित रक्कम मिळणार आहे. राज्य सरकारने सुरू केलेली लाडके बहिण योजना खूपच प्रसिद्ध झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ला महाराष्ट्रातील महिलांनी खूपच चांगले प्रतिसाद दिले आहे. झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लडकी बहीण योजनेमुळे महिलांनी सरकारला चांगलेच पाठिंबा दिल्याचे दिसून आले. योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रति महिना जमा करण्यात येत होते लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे नियमित जमा करण्यात येत असतात महिन्यातील फेब्रुवारी चे हप्ता प्रतीक्षेत होते पण आता फेब्रुवारी व मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार असून तीन हजारांची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
जागतिक महिला दिनाची लाडक्या बहिणींना गिफ्ट
जागतिक महिला दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री आणि लाडकी बहीण योजनातील पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे दोन्ही एकत्रित हफ्ता जमा होईल असल्याचे सांगण्यात येत आहे. दिनांक 7 मार्च 2025 पासून पात्र महिलांच्या खात्यामध्ये 3000 हजार रुपये निधी एकत्रित जमात करण्यात येईल असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसाआधी सांगितले होते त्यामुळे लाडक्या बहिणींना आजपासून कोणत्याही क्षणी पैसे येऊ शकतात . आणि लाडक्या बहिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचे पैसे 3000 रुपये मिळतील
बँक ऑफ बडोदा अंतर्गत 4000 रिक्त पदांची भरती ची जाहिरात आली ! पदवीधर उमेदवार अर्ज करू शकता
खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही असं चेक करा
महिलांना पैसे आपल्या खात्यामध्ये आले असल्यास बँके कडून एके एसएमएस येईल .
बँकेमार्फत एसेमेस न मिळाल्यास तुम्ही एक तर बँकेच्या टोल फ्री नंबर वर मिस कॉल देऊन बॅलन्स चेक करू शकता किंवा एसएमएस देखील पाठवून तुम्ही मेसेज द्वारे रक्कम तपासू शकता
तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर गुगल पे ,नेट बँकिंग किंवा फोन पे मार्फत बॅलन्स तपासू शकता
एटीएम कार्ड असल्यास एटीएम मध्ये जाऊन बॅलेन्स तपासू शकता.
तसे न झाल्यास तुम्ही बँकेत पासबुक नेऊन तुम्ही जमा राशी तपासू शकता.
अपात्र लाडक्या बहिणींची छाननी कधी होणार
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या शासन निर्णयातील निकष जसेच्या तसे कायम ठेवले गेले आहेत. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया आणि कार्यवाही हेच निकष पाळून पार पडत आहे. योजनेच्या अटी व शर्तींच्या आधारेच लाभार्थी महिलांची पात्रता आणि अपात्रता निश्चित केली जात आहे. त्यानुसार अर्जांची सखोल तपासणी केली जात आहे. कोणत्याही योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जांचे परीक्षण हा सातत्याने सुरू राहणारा टप्पा असतो.